मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय मदत व पुनर्वसन विभाग *नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत गावांचे पुनर्वसन करणार**सर्वसमावेशक धोरण निश्चित*राज्यामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यानुसार बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येतील. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. प्रकारची ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती येते त्या त्या वेळी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई प्रचलित धोरणानुसार शासनस्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात येते. शासनाचे पुरग्रस्तांचे पुनर्वसन बाबतचे सदरचे धोरण निश्चित होऊन जवळपास 15…Read more
बडोले यांना सर्वस्तरातून पाठिंबाघड्याळ चिन्ह घराघरात पोहचलेगोंदिया, दि.18-महायुतीचे राजकुमार बडोले यांच्या प्रचारात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक केली. मतदान चिठ्ठी घराघरात पोहचवली. त्यामुळे त्यांचे चिन्ह घड्याळ लोकांपर्यंत पोहचले. या प्रचाराने मतदारांमधील चिन्हाचा घोळ संपुष्टात आला. मोरगाव अर्जुनी विधान सभा मतदार संघ भाजपच लढवणार यावर पक्षश्रेष्ठी ठाम होते. त्यामुळे या जागेसाठी प्रचंड ओढाताण झाली. अखेर उमेदवार आमचा चिन्ह तुमचा यावर समेट झाला. त्यानुसार राजकुमार बडोले यांना खूद उपमुख्यमंत्री राजकुमार बडोले यांना फोन आला. श्रेष्ठीच्या आदेशानुसार घड्याळ चिन्हावर मैदानात उतरले. हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यास प्रचारासाठी गावंगाव पालथे घातले. त्यानंतर तालुकांस्तरावर नेत्यांच्या सभांचा सपाटा लावला. सभांमध्ये सर्वस्तरातील मतदारांनी गर्दी केली. .…Read more