info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  09 Sep 2024

तिन्ही पक्षांच्या उमेदवारी शर्यंतीत बडोलेंची बाजी


-▪आदिवासींच्या विकासाचे नवे सूत्र, "संस्कृती,शिक्षण, सायन्स, स्वाभिमान, सन्मान आणि रोजगार" राजकुमार बडोले यांचा निर्धार.

*धाबेपवनी(नवेगाव बाध)* धम्म परिषदेच्या पाठोपाठ आदिवासी परिषदेला भरघोष प्रतिसाद मिळाला. यातून तीन पक्षांच्या उमेदवारी शर्यंतीत भाजपचे राजकुमार बडोले यांनी बाजी मारल्याची चर्चा परिषद स्थळी रंगली होती. मोरगाव-अर्जुनी विधानसभा मतदार संघात भाजप,राकॉ आणि शिवसेनेची महायुती आहे.त्यातच राष्ट्रवादीची दोन शकले पडली .त्यामुळे या मतदार संघावर भाजप व राकॉंने(अजीत पवार )  दावा केला आहे. मात्र समाज परिषदांच्या माध्यमातून दुरावलेले समाज जोडण्यात पुन्हा बडोले यांना यश आले.  आदिवासींच्या प्रतिसादाने बडोले गदगद झाले.अन् अतिशय जोशपुर्ण भाषणातून आदिवासी विकासाच्या नव्या संकल्पांची घोषणा केली. 

माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आपल्या जोशपूर्ण भाषणात म्हणाले, आदिवासींची संस्कृती, शिक्षण, स्वाभिमान, सायन्स, सन्मान आणि रोजगार म्हणजे  " या पंचसूत्रीच्या माध्यमातून आदिवासीचे जीवन बदलण्याचा संकल्प आहे. त्यासाठी आदिवासी परिषदेच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आहोत. यातून आदिवासींच्या सर्वागिण विकासाचा संकल्प घेऊन जा !आणि आपल्या घरावर ही पंचसूत्री लिहून ठेवा, असे त्यांनी आवाहन केले.
 राजकुमार बडोले फाऊंडेशनतर्फे आयोजित आदिवासी परिषदेला मोठ्या संख्येने आदिवासी स्त्री-पुरूषांनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आदिवासी ध्रुव गोंड समाज अध्यक्ष एम डी ठाकुर होते.तर परिषदेचे उदघाटन प्रकाश गेडाम ,प्रदेश सचिव यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन माजी आमदार संजय पुराम, हनवंत वट्टी व डॉ.चंदा कोडवते यांनी केले. बडोले यांनी आपल्या भाषणातून पंचसूत्रीच्या मुद्दांवर विस्ताराने प्रकाश टाकला. शिक्षण आणि रोजगाराची आवश्यकता विषद केली.

ते पुढे म्हणाले, जल, जंगल आणि जमिनीचे खरे तुम्ही मालक आहात. हा सातबारा तुमच्या पिढ्याच्या नावे होता. या देशाचे मुलनिवासी तुम्ही आहात. तुमचा इतिहास वैभवशाली आहे. तो परत मिळविण्याच्या संकल्पासह विकासाच्या दिशेने पुढे चला. तुमचा भूतकाळ सुवर्ण होता. तसा भविष्य घडवू.
स्थानिक प्रश्नावर बोलताना त्यांनी वनहक्क दावे त्वरीत निकाली काढुन वनजमीनीचे पट्टे शेतकर्यांना देण्यात यावे, झाशी नगर उपसा सिंचन योजनेचे पाणी झाशी नगर, रामपुरी,येलोडी,धाबेपवनी या भागातील बारा गावातील शेतकऱ्यांना मिळावे .यासाठी शिल्लक काम लवकर व्हावे, आदिवासी गोंडी भाषेचे संवर्धन करण्यासाठी अनुसुची नऊ मध्ये सामील करावे . याबाबत आपण आग्रही असल्याचे सांगितले.स्थानिक आदिवासी तरुणांना पोलिस भरती, पटवारी, ग्रामसेवक, यांसारख्या ग्रामीण नोकरीत प्राधान्य देण्यात यावे याबाबत सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. ते तुमच्या पदरात पडे पर्यत थांबणार नाही असा निर्धार आपण सगळे करू. मी सदैव तुमच्या सोबत आहे असे त्यांनी सांगितले. 

मंचावरून बोलताना माजी आमदार संजय पुराम यांनी आपल्या ग्रामीण बोलीभाषेत आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी राजकुमार बडोले कटीबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.समाजाचा विकास करण्यासाठी आम्ही दोघेही आपल्यासोबत असल्याचे सांगून धाबेपवनी येथील अनेक आठवणींना त्यांनीं उजाळा दिला. प्रकाश गेडाम यांनी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मंत्री काळात केलेल्या अनेक कामांचा उल्लेख करताना लंडन येथील परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे घर व मुंबई येथील इंदु मील या जागेवर जगातील सर्वात मोठे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी राजकुमार बडोले यांनी केलेले कार्य दोनशे वर्षे समाज विसरणार नाही असे सांगितले.
ज्या बाबासाहेबांना याच भुमीत  हरविल्या गेले होते. तिथेच राजकुमार बडोले यांचा सुद्धा पराभव केला . आता ती चुक सुधारण्याचे आवाहन त्यांनी केले. डाॅ चंदा कोळवते यांनी संविधान बदलण्याचे खोटे नरेटीव्ह सेट करून समाजाला विकासापासून कोसो दूर ठेवणाऱ्या लोकांना धडा शिकविण्याचे आवाहन समाजबांधवांना केले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजहंस ढोके ,चेतन  वडगाये,पराग कापगते,संजय खरवडे,सुदाम कोवे, बाबुराव काटेंगे,लक्ष्मण काटेंगे,विजय कापगते,तानेशजी ताराम, दयाराम काटेंगे,गणेश ताराम, अमोल डोंगरावर, जगदीश राऊत, रमेश काटेंगे,टिकाराम दर्रो, गोवर्धन सयाम, सुनील कोरेटी,अक्षय नेताम,भोजु कवडो,विठ्ठल आदमने, हिरामण टेंभुर्णे, कैलास नंदेश्वर,सुनिता कवडो,सुशीला मडावी, लहुजी मडावी, रमेश काटेंगे,सागर काटेंगे,सोनम पंधरे,भुषण करपते,अजय मसराम,जयेंद्र चौधरी,वर्षा गावडे, दिपाली दर्रो,सरीता काटेंगे, अल्का मरस्कोले, तनुजा दर्रो,व अनेक समाज बांधवांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला सरपंच पपीता नंदेश्वर,सपना नाईक,पद्मा परतेकी,निशा तोडासे, डॉ नाजुक कुंभरे,छाया आमले, आशाताई गदवार, जयश्री देशमुख, भोजराम लोगडे, व अनेक मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी १० वी १२ वी परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सरपंच, उपसरपंच,व सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या परिषदेसाठी विविध गावातील आदिवासी जत्थे पारंपारिक वेषभूषेत आले. त्यांनी समुहाने गोंडी नृत्य सादर केले. या नृत्यांच्या व वाद्यांच्या ठेक्यावर अनेकांनी ताल धरला.