info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  09 Mar 2023

बहुआयामी व्यक्तीत्त्व असाल तरच स्पर्धेत टिकाल- डॉ.नितनवरे


 739 विद्यार्थ्यांना टॅबचे तर 13 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप
नागपूर,दि. 6 : तरुणाईची शक्ती भारताचे भविष्य आहे. त्याआधारे भारत महासत्ता बनु शकते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी टिकाव धरण्यासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व असणे काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन वेध भविष्याचा-डिजीटल क्रांतीचा या कार्यक्रमात समाज कल्याण आयुक्त डॅा. प्रशांत नारनवरे यांनी केले.
दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात टॅब वाटप व वेध भविष्याचा-डिजीटल क्रांतीचा या मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलत होते. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे(महाज्योती) राजेश खवले, प्रादेशिक उपायुक्त डॅा. सिद्धार्थ गायकवाड, उपायुक्त तथा सदस्य जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सुरेंद्र पवार, सहाय्यक समाजकल्याण आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे. त्यानुसार अभ्यासाची पद्धत आखावी. एकाच विषयाकडे लक्ष न देता अनेक विषयांचा सखोल अभ्यास करावा. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकासास मदत होईल. सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. दिवसागणिक तंत्रज्ञान बदलत आहे. आज आपल्याजवळ असलेला मोबाईलचा फायदा कसा करून घेता, येईल याकडे विशेष लक्ष द्यावे. काळानुरूप आपली जीवनपद्धती बदलून सकारात्मकडे जीवनाकडे पाहण्याची गरज आहे. एकीकडे अपुरा कर्मचारी वर्ग आणि दुसरीकडे रोजगाराची गरज अशी परिस्थिती आहे. यासाठी सक्षम मनुष्यबळ तयार होणे गरजेचे आहे.
आज मान्यवरांच्या टॅबचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. त्यांनी या टॅबचा वापर हा आपली शैक्षणिक क्षमता वाढविण्यासाठी करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात जग झपाट्याने बदलत आहे. कोरोनापासून तर जग झपाट्याने बदल आहे. तंत्रज्ञानाचा वापर हा वाढला आहे. काळानुरूप बदलणे आवश्यक असल्याचे श्री.नारनवरे पुढे म्हणाले.
  कार्यक्रमाच्या प्रारंभी महाज्योतीतर्फे 739 टॅब मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यासोबतच 13 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्‌यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक उपायुक्त डॅा. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले. यावेळी उपायुक्त तथा सदस्य जात प्रमाणपत्र पडताळणी समितेचे सुरेंद्र पवार, सहाय्यक समाजकल्याण आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार प्रशांत आडे यांनी केले. या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.