तळीये गावावर दरड कोसळसी ,30 वर मृत्यू, 72 बेपत्ता
तळीये गावावर दरड कोसळली,
तिसच्यावर मृत्यू , 72 बेपत्ता
मुंबई,दि.22 - मुसळधार पावसामुळे कोकणात हाहाकार माजला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला. दरम्यान महाड तालुक्यातील बडीये गावात सायंकाळी दरड कोसळली.त्यात 32 घरे दबली. यामध्ये तब्बल 72 जणं बेपत्ता असल्याची माहिती आहे.
हे गाव बिरवाडी पासून 14 किलोमीटरवर आहे. गुरुवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. त्या दरम्यान ही घटना घडल्याचे तळीयेच्या सरपंचाने सांगितले. तक्रार केल्यानंतर मदत पथके पोहचली. सतत पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.